Wednesday, December 3, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!

mh13news.com by mh13news.com
6 months ago
in आरोग्य, सामाजिक, सोलापूर शहर
0
रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!
0
SHARES
10
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

मानवी रक्ताची गरज कधीही न संपणारी असल्यामुळे रक्तदानाची प्रेरणा समाजात द्दढ करणे, निरोगी रक्तदात्यांची फौज तयार करून रक्तदात्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाविषयी जनजागृती करणे, सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदात्यांविषयी कृतज्ञता निर्माण व्हावी…  जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने एवढाच उद्देश..

“रक्तदाता” हा रुग्णांचा जीव वाचविणारा महत्त्वाचा दुवा आहे. अनेक वर्षांपासून ज्या रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून आयोजित रक्तदान शिबिरात, रक्तकेंद्रात स्वयंस्फूर्तीने जवळच्या शासन मान्यता प्राप्त रक्तकेंद्रात गरजू रुग्णांसाठी रक्तदान (२५,५०,१०० किंवा त्यापेक्षा जास्त वेळा )केलेल्या रक्तदात्यांप्रति आभार व्यक्त  करण्याचा दिवस म्हणजे “१४ जून जागतिक रक्तदाता दिन”.

मानवाचे प्राण वाचवण्यासाठी ज्या रक्तदात्यांनी आपले स्वैच्छिक रक्तदान करुन रक्तदात्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस…..म्हणजे १४ जून जागतिक रक्तदाता दिवस..

ए,बी,ओ ‘रक्तगटाचा जनक ‘ कार्ल लँडस्टेनर यांच्या जयंतीदिनी १४ जून  हा ‘जागतिक रक्तदाता दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. सहानुभूती व सामाजिक बांधिलकी व स्वेच्छेने रक्तदान करणारे रक्तदाते यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा ‘जागतिक रक्तदाता दिवस’ साजरा करण्यात येतो.

या वर्षाचे शासनाचे घोषवाक्य आहे, झालेल्या;

“रक्त देऊ या..आशा जागवू या… : एकत्रितपणे जीव वाचवू या…।”

“Give blood, give hope: together we save lives..!”

आधुनिक तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात प्रगत झाले असले तरी पण अजूनही मानवी रक्ताला कुठलाही पर्याय  आजपावेतो मानवाला अथवा शास्रज्ञांना सापडला नाही. यासाठी माणसाचे प्राण वाचवण्यासाठी मानसाचेच रक्त लागते. हे आजही जगजाहीर आहे. कुणाला कधी आणि कोणत्यावेळी रक्ताची गरज भासू शकते हे कोणीही सांगू शकत नाही.

“रक्त” हे  प्रत्येक मानवाच्या शरीरात तयार होत असते. रक्तदान ही जीव वाचविण्याची प्रक्रिया आहे आणि जीव वाचवणे नक्कीच सामान्य गोष्ट नाही! ही बाब नागरिकांच्या लक्षात आणून देऊन स्वैच्छिक रक्तदान मोहीम राबविणे महत्त्वाचे ठरते.

आपल्या शरीराला जिवंत ठेवणाऱ्या घटकांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त.रक्त हे शरीराचा अविभाज्य घटक असुन संपूर्ण मासपेशींना तसेच अवयवांना पोषक व प्राणवायू (आँक्सिजन)देण्याचे कार्य रक्त करत असते.

स्वैच्छिक रक्तदान…वाचवी रुग्णांचे प्राण…विषयी जनजागृती : 

१)रक्त हे फार काळ टिकवून अथवा साठवता  येत नसल्यामुळे सतत रक्तदानाद्वारे रक्ताची गरज पूर्ण होते.

२)”रक्तदान” थँलेसेमिया, हिमोफिलिया ,ल्युकेमिया इ. रुग्णांसाठी “लाईफ लाईन” आहे .अशा रुग्णांना नेहमी रक्ताची गरज भासते. अशा रुग्णांना कधीही रक्ताची कमतरता भासू नये म्हणून स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे…..!

३)अतिदक्षता,प्रसुती,अपघात, रक्तक्षय,अतिरक्तस्राव इ.आदी अशा रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तातडीने रक्ताची आवश्यकता भासते.अशा रुग्णांसाठी स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे….!

४)आपल्या रक्तदान केलेल्या एका युनिट मधून रक्त व रक्तघटक वेगळे केले जातात.(तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी(प्लाझमा),रक्तबिंबीका (प्लेटलेट्स)इ.अशाप्रकारे आपल्या रक्तदानाने एक ते तीन रुग्णांचे प्राण आपण वाचवू शकता.

५) माझ्या रक्तदानाने निश्चितच गरजूंना रक्त पुरवठा झाल्याचे समाधान मिळणार..यासाठी स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे.!

६) रक्तदानाने….  शरीरातील रक्तदाब,कोलेस्टेराँलचे प्रमाण योग्य नियंत्रण  राहते.

७)   समाजाचे ऋण फेडायची ही एक संधी रक्तदानामुळे मिळते..

८) नवीन रक्त तयार करण्याची क्षमता वाढते.

९)रक्तदान केल्यानंतर चोवीस तास ते सात दिवसात नैसर्गिकरित्या झिज भरून निघते.

१०)रक्तदान केल्यानंतर नवीन पेशी तयार होण्यासाठी नवचेतना निर्माण होते.

११)शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रक्तदान प्रक्रियेत रक्तदानावेळी सुरक्षिततचे काटेकोरपणे पालन केले जाते.

१२)समाजाचा एक जबाबदार नागरिक म्हणून निःस्वार्थीपणे, समाजहितासाठी, राष्ट्रसेवा म्हणून रक्तदान महत्त्वाचे आहे.

१३)निरोगी व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करु शकता.

यासाठी शासनस्तरावरुन समाजात स्वैच्छिक रक्तदानाबाबत सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी विविध उपक्रम, अभियान, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. सोबतच स्वैच्छिक रक्तदान विषयी नागरीकांमध्ये सामाजिक बांधिलकी, समाजहित, राष्ट्रीयतेची भावना, युवा शक्तीमध्ये रक्तदानाविषयी गैरसमज दूर करून स्वैच्छिक रक्तदानाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे, सुदृढ मानसिक आरोग्य, स्वैच्छिक रक्तदानाबाबत समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

यासाठी केंद्र सरकार अंतर्गत राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र शासनातर्फे आरोग्य विभाग,महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सो.,राज्य रक्त संक्रमण परिषद, धर्मदाय,  सांस्कृतिक/सामाजिक सेवाभावी संस्था , विविध संघटना इ.मार्फत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार  स्वैच्छिक रक्तदान शिबिरे तसेच जनजागृती पर कार्यक्रम आयोजित केले जातात. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. पण शासन स्तरावर जनजागृती मोहीम वेळोवेळी राबविण्यात येते.

आपल्या रक्तदानामुळे, आपण अनेक लोकांचे जीवन वाचवू शकतो. स्वैच्छिक रक्तदान हे सामाजिक कार्याबरोबर कर्तव्य देखील आहे. जे आपल्याला आपल्या समाजात जोपासण्याची गरज आहे.

“रक्तदाता” हा रुग्णांसाठी नेहमी आशेचा किरण ठरला आहे. “रक्त” हे कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही तर ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात.यासाठी “रक्तदाता” म्हणून आपण स्वतःहून स्वैच्छिक रक्तदान करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी शासनाच्या घोषवाक्यानूसार “करुया स्वैच्छिक रक्तदान… गरजूं रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी … आशा जागवू… या…!

यासाठी सामाजिक बांधिलकी ठेऊन एकत्रितपणे स्वैच्छिक रक्तदान मोहीम राबवून…. रुग्णांचे प्राण वाचवू या..!

Previous Post

एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क; आपत्ती स्थितीत तत्परतेने मदतीस तयार

Next Post

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

Related Posts

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!
सामाजिक

सोलापुरातील कंपनीचा CNG पंप अचानक बंद; वाहनधारकांची गैरसोय..!!

2 December 2025
अट्रॉसिटी प्रकरण |   बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..
महाराष्ट्र

अट्रॉसिटी प्रकरण | बिराजदार यांना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन..

30 November 2025
अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष
महाराष्ट्र

अण्णा 75 वर ठाम..!! solapur पिण्याचे पाणी व रोजगाराला सर्वोच्च प्राधान्य : अण्णा बनसोडे, विधानसभा उपाध्यक्ष

29 November 2025
अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..
गुन्हेगारी जगात

अब तक 110 | नई जिंदगी चौक खून प्रकरण : आरोपीला जन्मठेप..

29 November 2025
शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण
सामाजिक

शुक्रवारी | ‘सत्यशोधक महात्मा जोतीबा फुले फेस्टिव्हल’ राज्यस्तरीय प्रबुद्ध पुरस्कारांचे वितरण

27 November 2025
मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…
महाराष्ट्र

मोहोळ व मैंदर्गी निवडणूक प्रकरणात उमेदवारांना धक्का..!जिल्हा न्यायालयातून मोठी अपडेट…

25 November 2025
Next Post
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची 'जिल्हाध्यक्ष'पदी निवड..!

  • Home
  • New Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.