MH 13 News Network
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आज शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते प्रसारमाध्यमांशी बोलताना सोलापुरात 25 पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती त्यांनी दिली.
काय म्हणाले पालकमंत्री…!
सोलापुरात साधारण 25 पाकिस्तानी नागरिक वास्तव्याला आहेत. यामध्ये कायमस्वरूपी व्हिजा असणारे म्हणजेच लॉन्ग टर्म व्हिजा असणारे 10 ते 11 जण आहेत. तर 14 लोक असे आहेत की ज्यांना पुन्हा पाकिस्तानात परत पाठवता येईल अशी परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोलापूरचे पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांच्याशी पालकमंत्र्यांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.
ते सिंधी हिंदू असून यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.
ज्यांना लॉन्ग टर्म व्हिजा देण्यात आला आहे त्यांना काहीतरी योग्य कारण पाहूनच दिला असेल,ज्या हिंदू बांधवांना पाकिस्तान मध्ये त्रास भोगाव लागला ते येथे आले असू शकतील अशी शक्यता नाकारता येणार नाही. असेही ते म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर निर्णय घेतले आहेत.
त्याच अनुषंगाने राज्याला पण सूचना देण्यात आल्या आहेत. आज शुक्रवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यानंतर प्रशासन हे ॲक्शन मोडवर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या चर्चेनंतर या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यातील पाकिस्तानी नागरिक यांच्या वास्तव्यावर आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे.
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक ४८ तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.