mh 13 news network
सोलापूर / प्रतिनिधी :
राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, शिवसेना (उबाठा गट) चे माजी उपमहापौर विष्णू निकंबे तसेच माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या निमित्ताने जुनी मिल कंपाउंड येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित स्वागत-सत्कार सोहळ्यात शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे आणि तौफिक शेख यांच्या नेतृत्वात नवप्रविष्ट नेत्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला वसीम बुऱ्हाण, मकबूल मोहोळकर, हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, फारूक मटके, शशिकांत कांबळे, बसवराज बगले, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, तस्लिम शेख, बहिदा अफा शेख, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, महेश कुलकर्णी, चेतन गायकवाड, खलील शेख, प्रमोद भोसले, सुजित अवघडे, युवराज चुंबळकर, प्रकाश जाधव, अल्मेहराज आबादिराजे, श्रीकांत वाघमारे, प्रियंका पवार, निशांत तारानाईक, नारायण माशाळकर, बसवराज कोळी, रुपेशकुमार भोसले, सरोजनी गायकवाड, श्यामराव गांगर्डे, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, सचिन चलवादी, धनंजय जाधव, सत्येन जाधव, अनिकेत पवार, गिरीश पवार यांच्यासह सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात आणखी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी संतोष पवार, जुबेर बागवान, चंद्रकांत दायमा, सुधीर खरटमल, किसन जाधव आणि आनंद चंदनशिवे यांनी बोलताना सांगितले की,
“आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अब की बार ५० पार हा आमचा निर्धार आहे.”
सद्यस्थितीत राज्यात महायुती सरकार प्रभावीपणे काम करत आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पार्टी व शिवसेना (शिंदे गट) या सत्ताधारी पक्षांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
जर महायुतीत समन्वय झाला तर निवडणूक एकत्र लढवली जाईल, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुकीचा सामना करेल, असे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सुधीर खरटमल, किसन जाधव आणि आनंद चंदनशिवे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
विविध पक्षांतील नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद प्रचंड वाढली असून,
“आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच प्रचंड बहुमताने विजयी होईल,”
असा विश्वास शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केला.
सोलापूर / प्रतिनिधी :
राष्ट्रीय अध्यक्ष ना. अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, शिवसेना (उबाठा गट) चे माजी उपमहापौर विष्णू निकंबे तसेच माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या निमित्ताने जुनी मिल कंपाउंड येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित स्वागत-सत्कार सोहळ्यात शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे आणि तौफिक शेख यांच्या नेतृत्वात नवप्रविष्ट नेत्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला वसीम बुऱ्हाण, मकबूल मोहोळकर, हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, फारूक मटके, शशिकांत कांबळे, बसवराज बगले, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर, कार्याध्यक्ष चित्रा कदम, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, तस्लिम शेख, बहिदा अफा शेख, युवक अध्यक्ष सुहास कदम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, महेश कुलकर्णी, चेतन गायकवाड, खलील शेख, प्रमोद भोसले, सुजित अवघडे, युवराज चुंबळकर, प्रकाश जाधव, अल्मेहराज आबादिराजे, श्रीकांत वाघमारे, प्रियंका पवार, निशांत तारानाईक, नारायण माशाळकर, बसवराज कोळी, रुपेशकुमार भोसले, सरोजनी गायकवाड, श्यामराव गांगर्डे, वैभव गंगणे, सोमनाथ शिंदे, सचिन चलवादी, धनंजय जाधव, सत्येन जाधव, अनिकेत पवार, गिरीश पवार यांच्यासह सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात आणखी अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी संतोष पवार, जुबेर बागवान, चंद्रकांत दायमा, सुधीर खरटमल, किसन जाधव आणि आनंद चंदनशिवे यांनी बोलताना सांगितले की,
“आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अब की बार ५० पार हा आमचा निर्धार आहे.”
सद्यस्थितीत राज्यात महायुती सरकार प्रभावीपणे काम करत आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भारतीय जनता पार्टी व शिवसेना (शिंदे गट) या सत्ताधारी पक्षांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
जर महायुतीत समन्वय झाला तर निवडणूक एकत्र लढवली जाईल, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणुकीचा सामना करेल, असे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, सुधीर खरटमल, किसन जाधव आणि आनंद चंदनशिवे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
विविध पक्षांतील नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने पक्षाची संघटनात्मक ताकद प्रचंड वाढली असून,
“आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच प्रचंड बहुमताने विजयी होईल,”
असा विश्वास शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी व्यक्त केला.








