MH 13 NEWS NETWORK
सोलापूर — मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येत असल्याची घोषणा होताच सोलापुरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या ऐतिहासिक घडामोडीचे स्वागत करत शहरात जल्लोष साजरा करण्यात आला. सोन्या मारुती गणपती मंदिरात महाआरती करून मनसे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
दोन बंधू एकत्र येणे म्हणजे मराठी माणसाच्या ऐक्याची ताकद असल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांमध्ये दिसून आली. फटाक्यांची आतषबाजी, घोषणा आणि जल्लोषात “मराठी एकजूट जिंदाबाद”चे नारे दिले गेले. या राजकीय एकत्रिकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड, मनसे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जैनोद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके यांच्यासह जितेंद्र टेंभुर्णिकर, सुभाष माने, विजय पुकाळे, पवन देसाई, बाळासाहेब गायकवाड, आबा सावंत, सुरेश जगताप, गणेश पाटील, गोविंद बंदपट्टे, बंटी बेलमकर, वैभव रंपुरे, अनिकेत उपासे, समर्थ माळगे, अभि इरकल, सैपन जामखंडी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
राजकीय वर्तुळात या घडामोडीने नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.








