Tuesday, June 17, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पाणी, वीज, रोजगाराचा प्रश्न सोडवू ; दक्षिणमध्ये धर्मराज काडादी यांच्या प्रचाराचा झंझावात

MH13 News by MH13 News
10 November 2024
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
पाणी, वीज, रोजगाराचा प्रश्न सोडवू ; दक्षिणमध्ये धर्मराज काडादी यांच्या प्रचाराचा झंझावात
0
SHARES
83
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

पाणी, वीज, रोजगाराचा प्रश्न सोडवू दक्षिणमधील गावभेट दौर्‍यात काडादी यांची ग्वाही

दहा वर्षांपूर्वी मतदारांनी ज्यांना मोठ्या आशेने निवडून दिले. त्यांनी मतदारसंघाचा विकास करण्याऐवजी द्वेषाचे राजकारण केले. त्यामुळे जनतेचे मूलभूत प्रश्नही सुटले नाहीत. सुडाचे राजकारण करणार्‍या लोकप्रतिनिधीला पराभूत करण्याची हीच वेळ असून आपल्याला मतदारांनी सेवेची संधी दिली तर या मतदारसंघातील शेतीच्या सिंचनाबरोबरच पिण्यासाठी पाणी, वीज, रस्ते आणि रोजगाराचा प्रश्न मार्गी लावून तरूणांना स्वावलंबी बनवू, अशी ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी दिली. शनिवारी, काडादी यांनी वडकबाळ, वांगी, मनगोळी, गावडेवाडी, अकोले (मंद्रूप), गुंजेगाव, कंदलगाव, अंत्रोळी आणि निंबर्गी या गावांचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला.

या दौर्‍यात ठिकठिकाणी काडादी यांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. त्यांच्या या दौर्‍यात स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, माजी सभापती महादेव पाटील, भीमाशंकर जमादार, सिकंदरताज पाटील, सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक विद्यासागर मुलगे, शिवानंद पाटील- कुडल, राजशेखर पाटील, अ‍ॅड. शिवशंकर बिराजदार, सुरेश झळकी, लक्ष्मण झळकी, प्रा. संतोष मेटकरी, शिवशरण दिंडोरे, अशोक देशमुख आदी उपस्थित होते. मतदारांशी झालेल्या संवादाच्यावेळी काडादी म्हणाले, या मतदारसंघातील मतदारांनी ज्यांना दहा वर्षे निवडून दिले.

त्या भाजपच्या लोकप्रतिनिधींनी विकासाचे राजकारण करण्याऐवजी सहकारी संस्था व सहकारी चळवळ उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. सहकारमंत्री असताना त्यांनी सहकारी संस्थांचे बळकटीकरण व सक्षमीकरणासाठी पदाचा सदुपयोग करण्याऐवजी त्यांनी सहकारी संस्था बंद पाडण्याचे धोरण अवलंबले. शेतकर्‍यांसाठी मंदिरासमान असलेल्या श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडून राज्याच्या सहकार चळवळीत आदर्श असलेला हा साखर कारखाना बंद पाडण्याचे कुकर्म केले. त्यामुळे त्याचा राग शेतकरी सभासद आणि समस्त मतदारांमध्ये आहे.

शेतकर्‍यांच्या अन्नामध्ये विष कालविण्याचा प्रयत्न केलेल्या भाजपच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पराभूत करून आपला राग दाखवून दिला. तोच संताप अजूनही कायम असून सिध्देश्वर कारखाना बंद पाडून स्वत:चा खासगी कारखाना चालावा म्हणून हा उद्योग करणार्‍या भाजपच्या आमदाराला मतदार घरी बसविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास काडादी यांनी व्यक्त केला.खासदार, आमदार आणि मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतरही या भाजपच्या लोकप्रतिनिधीनी मतदारसंघाचा विकास केला नाही. उजनी धरणाचे हक्काचे पाणीही ते मतदारसंघातील शेतकर्‍यांना मिळवून देऊ शकले नाहीत. कालव्याची कामे अपूर्ण ठेवली. सिंचनाचे नवे स्रोत ते तयार करू शकले नाहीत.

भीमा नदीवर वडापूर येथे बॅरेज बांधण्याचे आश्वासन देऊन त्यांनी लोकांचा विश्वासघात केला. बॅरेज तर केलेच नाही, उलट पावसाळ्यात उजनी धरण भरल्यानंतर अतिरिक्त झालेल्या पाण्याने तालुक्यातील गाव तलाव, पाझर तलाव आणि ओढ्या-नाल्यांना पाणी सोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत. सीना आणि भीमा नद्यांवर बॅरेज बांधून शेतीला पाणी मिळवून दिले असते तर शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढून शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारली असती. शेतीच्या विजेचा प्रश्नही त्यांना सोडविता आला नाही. आजही अनेक शेतकरी शेतीला वीज मिळावी म्हणून धडपडताना दिसतात.

वीज नसल्यामुळे शेतीची सुधारणा होत नसल्याने अनेक शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारू शकली नाही.मिळालेल्या पदाचा लोकहितासाठी वापर करण्याऐवजी त्यांनी तालुक्यात भांडणे लावण्याचेच काम केले. निवडणुकीपुरते राजकारण मर्यादित असले पाहिजे. परंतु स्वार्थासाठी दुसर्‍यांच्या संस्था बंद पाडून आपल्याच संस्था चालाव्यात, हे त्यांचे कुटील राजकारण तालुक्यासाठी अत्यंत धोकादायक ठरले. त्यामुळे या लोकप्रतिनिधीला पराभूत करून, मतदारांनी आपल्याला संधी दिल्यास शेतीच्या व पिण्याच्या पाण्याबरोबच, विजेचा प्रश्नही मार्गी लावू, ग्रामीण भागात शेतीला जोडव्यवसाय असलेल्या दुग्धोत्पादनासारखे प्रकल्प सुरू करून शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी आपला प्रयत्न राहील, अशी ग्वाही काडादी यांनी दिली.

ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील प्रश्नांकडे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. सर्व प्रकारची सत्ता असतानाही शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात कमी पडले. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही शहराच्या हद्दवाढ भागातील नागरिकांना पाच दिवसांआड पाणीपुरवठा होतो. ज्यांच्याकडे पाणी साठविण्याचे साधन नाही, अशा गोरगरीब व कामगारांची मोठी अडचण होत आहे. हद्दवाढ भागात रस्ते, ड्रेनेज, पथदिव्याची सोय नाही. प्रामाणिकपणे कर भरणार्‍या करदात्यांचा त्यांनी भ्रमनिरास केला. शहरी बससेवा मोडकळीस आलेली असतानाही त्यामध्ये सुधारणा करण्याचे त्यांनी स्वारस्य दाखविले नाही.

हजारो कोटींचा निधी मिळूनही स्मार्ट सिटी भकास राहिली. शहरासाठी दोन उड्डाणपूल मंजूर होऊनही त्यांना ते प्रकल्प मार्गी लावता न आल्याने सोलापुरात वाहतुकीची कोंडी होताना दिसते, असे काडादी म्हणाले. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपल्याला मतदारांनी सेवेची संधी दिली तर सर्वांना सोबत घेऊन ग्रामीण आणि शहरी भागातील प्रश्न सोडविण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहील, असा विश्वास काडादी यांनी दिला.

काडादी यांनी भरघोस मतांनी विजयी करा : शिवदारे

राजशेखर शिवदारे म्हणाले, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांनी मोठ्या कष्टाने श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी करून शेतकर्‍यांच्या उसाचा प्रश्न सोडविला. त्यांना आर्थिक स्वावलंबी बनविले. गरिबांच्या मुलांसाठी शैक्षणिक संस्था उभारल्या. या संस्थांची धुरा धर्मराज काडादी यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी त्या सक्षमपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

मात्र गेल्या दहा वर्षांत त्यांना व्यक्तिगत व सिध्देश्वर परिवारातील संस्थांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न झाला. या संस्था टिकविण्यासाठी काडादी यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना विधानसभेत मतदारांनी निवडून पाठवावे. स्वच्छ प्रतिमा, पारदर्शी कारभार, निर्मळ आणि निस्पृह व्यक्तिमत्त्वाच्या काडादी यांच्यासोबत काँग्रेसची सर्व मंडळी असल्याने त्यांना मतदारांनी सेवेची संधी द्यावी, त्यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या ‘कॉम्प्युटर’समोरील बटण दाबून त्यांना भरघोस मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन केले. निवडून आल्यानंतर शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि शहरी भागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते निश्चितपणे प्रयत्न करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गटबाजी बाजूला सारून काडादी यांना विजयी करा : शेळके

बाळासाहेब शेळके म्हणाले, धर्मराज काडादी यांच्या प्रचार दौर्‍यास मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ते अपक्ष असले तरी आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी त्यांच्यासमवेत आहोत. त्यामुळे काडादी हे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत. मतदारांनी आपापसातील मतभेद, गटबाजी आणि हेवेदावे बाजूला ठेवून काडादी यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे. मागच्या दहा वर्षांत ज्या चुका केल्या त्या आता करू नका, कोणाबद्दलही राग, द्वेष नसलेल्या काडादी यांना विजयी करून तालुक्याच्या विकासाला गती देण्यासाठी त्यांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

भाजपची कीड घालवा : हसापुरे

सुरेश हसापुरे म्हणाले, दिग्गज नेत्यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या आग्रहाने धर्मराज काडादी हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वांनी ताकद उभी करावी. दहा वर्षांपूर्वी या मतदारसंघाला भाजपची कीड लागली. येथून निवडून आलेल्या भाजपच्या लोकप्रतिनिधीनी जनतेचे एकही ठोस काम केले नाही. समस्या घेऊन गेलेल्या नागरिकांनाच दमदाटी करून त्यांनी परत पाठविले आहे. अशा दडपशाहीच्या आमदाराला घरी पाठवा आणि निगर्वी व शांत स्वभावाच्या काडादी यांना विजयी करून विधानसभेत पाठवा. मतदारसंघात परिवर्तन घडवा, तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही बांधील आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यांनी केले स्वागत

वडकबाळ येथे धर्मराज काडादी यांचे सरपंच विलास राठोड, माजी सरपंच मलकारी पुजारी, ओग्यप्पा पुजारी, रावसाहेब व्हनमाने, चिदानंद पुजारी, सिध्दाराम पुजारी, पैगंबर शेख, गजानन पुजारी, रतिकांत हणमंतराव पाटील, वांगी येथे चिदानंद जवळकोटे, सुभाष बिराजदार, काका पाटील, चन्नप्पा बनशेट्टी, प्रकाश विभूते, इमाम मुल्ला, महादेव वाघमारे, बाबूराव बिराजदार, मेघराज हिरेमठ, महादेव भोपळे, मनगोळी येथे संजय गायकवाड, विठ्ठल घंटे, पापा शेख, प्रवीण पाटील, चंद्रकांत पुजारी, भारत घंटे, सुरेश देवकते, महिबूब शेख, गावडेवाडी येथे माजी सरपंच तानाजी यलगोंडे, बापू गावडे, रेवणसिध्द गावडे, गोविंद हक्के, अण्णाराव यलगोंडे, अकोले मंद्रूप येथे धोंडोपंत पाटील, रमेश आसबे, दादा जाधव, रावसाहेब पवार, गुंडू माने, गुंजेगाव येथे शहाजी पवार, विष्णू पाटील, सुभाष पाटील, आमिर शेख, राजेंद्र पवार, किशोर कुलकर्णी, दीपक हजारे, अशोक पवार, अमोगसिध्द पवार, कंदलगाव येथे बाबासाहेब पाटील, परमेश्वर पाटील, डॉ. महादेव जोकारे, योगेश जोकारे, अण्णाराव कोले, आनंदराव कोले, संजय पोतदार, श्यामराव व्हनमाने, भीमराव व्हनमाने, काशीनाथ पाटील, सुभाष कोरे, विठ्ठल उडाणशिव, सुधाकर जोकारे, निंबर्गी येथे सरपंच श्रीदीप हसापुरे, सिध्देश्वर साखर कारखान्याचे संचालक प्रमोद बिराजदार, अप्पासाहेब माने, चंद्रकांत बिराजदार, यदा दुपारगुडे, जगदेव सोड्डी, क्रांतीकुमार इंगळे, जगदेव डोळ्ळे, रफिक मुल्ला आदींनी स्वागत केले.

नद्यांवर बॅरेज बांधून सिंचनाचा प्रश्न सोडवू..

वडापूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधण्याची भाजपच्या आमदारांनी आतापर्यंत नुसती आश्वासने दिली. मात्र त्याची अंमलबजावणी केली नाही. भीमा आणि सीना नद्यांवर बॅरेज बांधले असते तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला नसता. मतदारांनी आपल्याला सेवेची संधी तर या दोन्ही नद्यांवर बॅरेज बांधून उन्हाळ्यात नदीपात्रात कायमस्वरूपी पाणी राहील यासाठी प्रयत्न करू, अशी ठाम ग्वाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांनी गावभेट दौर्‍यात मतदारांना दिली. उजनीच्या हक्काचे पाणी कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मिळवून देऊ, असेही त्यांनी आश्वासित केले.

Tags: solapurSolapur MaharashtraSouth solapurदक्षिण मतदार संघदक्षिण विधानसभा मतदारसंघधर्मराज काडादीराजशेखर शिवदारेसुरेश हसापुरे
Previous Post

दक्षिणेत वज्रमुठ : सूडाचे राजकारण बाजूला सारू ; एकदिलाने लढू – धर्मराज काडादी

Next Post

शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांची त्रिसूत्री..! भेटीगाठी, पदयात्रा,कॉर्नर सभा..

Related Posts

प्रेम, सुड आणि अनपेक्षित शेवट… ‘सजना’ सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित!
मनोरंजन

प्रेम, सुड आणि अनपेक्षित शेवट… ‘सजना’ सिनेमाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित!

17 June 2025
चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन
गुन्हेगारी जगात

चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सोनारास उच्च न्यायालयातून जामीन

17 June 2025
जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा
शैक्षणिक

जैन गुरुकुलात उत्साही वातावरणात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा
धार्मिक

सिद्धेश्वर प्रशालेत नंदीध्वज पूजनाने उत्साहात प्रवेशोत्सव साजरा

17 June 2025
मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!
महाराष्ट्र

मनगटाला घड्याळाची मिळाली साथ..! पाटलांची ‘जिल्हाध्यक्ष’पदी निवड..!

17 June 2025
रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!
आरोग्य

रक्त द्या, प्राण वाचवा – एकत्र येऊया माणुसकीसाठी!

14 June 2025
Next Post
शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांची त्रिसूत्री..! भेटीगाठी, पदयात्रा,कॉर्नर सभा..

शिवसेनेचे उमेदवार अमर पाटील यांची त्रिसूत्री..! भेटीगाठी, पदयात्रा,कॉर्नर सभा..

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.