Tuesday, October 14, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जनसमर्थन पत्रकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

MH 13 News by MH 13 News
6 months ago
in महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
जनसमर्थन पत्रकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
0
SHARES
20
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

18व्या आणि 19व्या शतकात इंग्लंड, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अन्य पाश्चिमात्य राष्ट्र आणि भारतामध्ये ज्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय चळवळी किंवा परिवर्तन झालीत, त्यात वृत्तपत्राचे योगदान मोलाचे आहे. जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक घडामोडी समाजापर्यंत येणारे वृत्तपत्र हे एक प्रमुख साधन होते आणि आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी “संपादकांनी घेतलेली स्वयंदीक्षा म्हणजे पत्रकारिता होय” असे म्हटले आहे. वृत्तपत्रे किंवा पत्रकारिता म्हणजे वर्तमानाची व्याख्या करणारी आणि भविष्य घडविणारी एक घटना आहे.

वृत्तपत्रामुळे समाजातील निर्भयता, स्पष्टपणा आणि स्वातंत्र्याचा उदय होतो. मानवी समाज वृत्तपत्रातील घटना, लेख-अग्रलेख वाचून प्रभावित होतो. अर्थातच त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्याप्रमाणे संपादकाला स्वयंदीक्षा घ्यावी लागते. कारण संपादकाच्या बौद्धिक, सामाजिक, जागृती आणि जाणीवेवरच हे सगळं अवलंबून असते. वृत्तपत्रांच्या कार्यानुसार आणि पत्रकाराच्या ध्येयानुसार पत्रकारितेला विविध भागात विभागीत करण्यात आले आहे. त्यात ‘ॲडव्होकेसी जर्नालिझम’ म्हणजे जनसमर्थन पत्रकारिता ही महत्त्वाची पत्रकारिता आहे.

‘ॲडव्होकेसी जर्नालिझम’ मध्ये पत्रकार एखाद्या विषयावर ठाम भूमिका घेतात आणि त्यांच्या लिखाणाने वाचक किंवा प्रेक्षकांना त्यांचा दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करतात. सामाजिक प्रश्न वा समस्या सोडवणुकीसाठी न्याय मिळवून देईपर्यंत सातत्यपूर्ण केलेली पत्रकारिता म्हणजे ‘ॲडव्होकेसी जर्नालिझम’ जनसमर्थन पत्रकारिता होय. या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा विचार करता, भारताला राष्ट्र म्हणून उभे राहायचं असेल, जगायचे असेल, तर सर्वप्रथम भारतातल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी प्राप्त करून द्यावी लागेल. हा ऐतिहासिक महामंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेने जगाला दिलेला आहे. माणूसपणाच्या भोवती असलेली विषबंदी, तिचा त्याग करण्याचा संकल्प प्रत्येक भारतीयांनी करून राष्ट्रभक्ती, राष्ट्रशक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्राच्या ऐक्याचा संकल्प करावा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच पत्रकारितेचे उद्दिष्ट होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तनाचा दृष्टिकोन स्वीकारून तत्कालीन स्पृश्य-अस्पृश्य समाज, राजकीय नेते, त्यांचे राजकीय विचार प्रवाह आणि ब्रिटिश सरकार यांच्या परस्पर वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, द्वन्दाची अधिक सटीक पद्धतीने मांडणी करून समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वलिखित अग्रलेखातील विविध पैलू हे समकालीन इतर पत्रकारांच्या पेक्षा भिन्न आहेत. त्यांची दृष्टी, विषय मांडणी, दूरदृष्टीची परिणामकारकता भेदक आणि मार्मिक आहे. त्यांचे लेखन बहुआयामी बहुविषयी स्पर्शित आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जनसमर्थन पत्रकारितेने माणूस घडविण्याच्या आणि एक नवीन भारत निर्मितीच्या महान क्रांतिकारी कार्यात अमूल्य योगदान दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा विचार करता 1920 ला त्यांनी ‘मूकनायक’ द्वारे मुक्यांना बोलके केले, तर ‘बहिष्कृत भारत’ ने बहिष्कृत समाजाला प्रबोधित करून अन्यायाविरुद्ध संघर्षासाठी तयार केले. याच बहिष्कृत भारतातील जनतेला त्यांच्या ‘जनता’ ने अधिकारांची आणि न्याय हक्काची जाणीव करून दिली. या देशातील मुक असलेल्या माणसाची प्रगती अशा पद्धतीने करत, माणसाला प्रबुद्ध नागरिक आणि देशाला प्रबुद्ध भारत बनविण्याचे महान कार्य ‘प्रबुद्ध भारता’तून त्यांनी केले आहे. त्यामुळेच एक नवा इतिहास घडला. असे कार्य त्यांच्या जनसमर्थन पत्रकारितेमुळे घडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचे उद्दिष्ट समाज परिवर्तन, समाज सुधारणा करणे, हे असल्यामुळे त्यांनी लोकप्रबोधन आणि लोक शिक्षण, सामाजिक जाणिवेच्या अनुषंगाने आपल्या अग्रलेखांचे लेखन केले आहे. त्या विषयाच्या मांडणीमध्ये त्यांचे सामाजिक परिवर्तन हेच ध्येय आहे. एकूण समग्र परिवर्तन आणि मानवी कल्याणाचे ध्येय हस्तगत करण्यासाठीच त्यांनी अग्रलेखाचे लेखन केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी महान राज्यघटना देऊन, एक स्वयंपूर्ण लोकशाही लोकराज्य म्हणून निर्माण केले आहे.  त्यामुळे खऱ्या अर्थाने ते जनसंपर्क पत्रकारितेचे जनक ठरतात.

Previous Post

राजधानी दिल्लीशी डॉ. बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे नातं…..

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल….

Related Posts

सी.ए. राजगोपाल मिणियार यांची अयोध्येच्या राममंदिर न्यासाच्या वित्त समिती सदस्यपदी नियुक्ती
धार्मिक

सी.ए. राजगोपाल मिणियार यांची अयोध्येच्या राममंदिर न्यासाच्या वित्त समिती सदस्यपदी नियुक्ती

14 October 2025
लोकमंगल फाउंडेशनचा ‘एक मुट्ठी अनाज’ उपक्रम यशस्वी
महाराष्ट्र

लोकमंगल फाउंडेशनचा ‘एक मुट्ठी अनाज’ उपक्रम यशस्वी

14 October 2025
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आमदार अभिजीत पाटील यांचा हातभार
महाराष्ट्र

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना आमदार अभिजीत पाटील यांचा हातभार

14 October 2025
मनपा आयुक्तांचा दणका | सपाटे, निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा
महाराष्ट्र

मनपा आयुक्तांचा दणका | सपाटे, निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा

14 October 2025
दिवाळीची_सोनेरी_किरणं | श्री. वि.गु. शिवदारे प्रतिष्ठानकडून पूरग्रस्तांना दिवाळी निमित्त १००० अन्नधान्य किटचे वाटप
महाराष्ट्र

दिवाळीची_सोनेरी_किरणं | श्री. वि.गु. शिवदारे प्रतिष्ठानकडून पूरग्रस्तांना दिवाळी निमित्त १००० अन्नधान्य किटचे वाटप

14 October 2025
सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी सदस्यपद आरक्षण सोडत जाहीर…
राजकीय

सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी सदस्यपद आरक्षण सोडत जाहीर…

14 October 2025
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल….

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमतेकडे वाटचाल….

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.