टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन
mh 13 news network
‘एआय’चा वापर करून महाराष्ट्र अन्नधान्य उत्पादनात आणि निर्यातीत जगातील सर्वोत्तम राज्य बनू शकतो, असा विश्वास निती आयोगाच्या फेलो आणि नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा देबजानी घोष यांनी व्यक्त केला.
‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला उपस्थित होत्या. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देबजानी घोष म्हणाल्या, “सध्या जग अन्नधान्याच्या तुटवड्याच्या संकटाला सामोरे जात आहे. महाराष्ट्राकडे तज्ज्ञ, कृषी उपकरणे, प्रशिक्षित कामगार आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता आहे. योग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीद्वारे राज्य अन्नधान्याच्या जागतिक निर्यातीत आघाडीवर राहू शकते. नवीन तंत्रज्ञान, सुधारित बियाणं, ड्रोन, सिंचन प्रणाली यांचा वापर करून कृषी क्षेत्रात उत्पादनक्षमता वाढवता येईल.
२०२० ते २०३० हे दशक कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) पर्व असणार आहे. कृषी, आरोग्य, ऊर्जा आणि उत्पादन क्षेत्रात ‘एआय’च्या साहाय्याने मूलभूत बदल घडवता येऊ शकतात. बायोटेक म्हणजे जीवशास्त्र आणि ‘एआय’ यांचा संयोग आहे. बायोटेक म्हणजे जीवन नव्याने घडविणे होय. महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीचा पाया म्हणजे ‘आयआयटी’ मुंबईसारखी शिक्षणसंस्था, स्टार्टअप इकोसिस्टम, उद्योगजगत, डिजिटल इकॉनॉमी, ग्रीन एनर्जी आणि प्रगत धोरणे यामुळे राज्य देशाच्या ‘जीडीपी’मध्ये मोठा वाटा उचलू शकते. असेही त्यांनी सांगितले.
आर. विमला यांनी सांगितले की, फक्त ‘एआय’वर अवलंबून राहून चालणार नाही, तर विज्ञान आणि ‘एआय’ व इतर आघाडीच्या तंत्रज्ञानांच्या साहाय्याने उद्योग आणि कृषी क्षेत्रात ठोस योजना आखून काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताच्या अन्नधान्य उत्पादनात अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्राने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) योग्य वापर केल्यास तो देशाच्या अन्नधान्य निर्यातीतील सर्वोत्तम राज्य ठरू शकतो, असे मत नॅसकॉमच्या माजी अध्यक्षा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ नेत्या देबजानी घोष यांनी व्यक्त केले.
त्यांच्या मते, AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पिकांचे उत्पादन, गुणवत्ता, साठवणूक आणि लॉजिस्टिक्स व्यवस्थापन यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करता येऊ शकते. “AI चा वापर करून शेतकऱ्यांना हवामान आधारित सल्ला, कीड नियंत्रण उपाय, तसेच बाजारपेठेतील मागणीचा अंदाज देणे शक्य होते. यामुळे अन्नधान्य निर्यातीच्या दृष्टीने महाराष्ट्रास प्रचंड संधी उपलब्ध आहेत,” असे घोष म्हणाल्या.
AI च्या सहाय्याने धान्याची गुणवत्ता तपासणे, त्याचे ग्रेडिंग करणे, व आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक दरात विक्री करणे शक्य होते. त्यामुळे महाराष्ट्रातील बासमती तांदूळ, कांदा, द्राक्षे, आंबा अशा उत्पादनांची निर्यात वाढवता येईल.
“महाराष्ट्र सरकार, शेतकरी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास राज्याला ‘स्मार्ट अॅग्रीकल्चर एक्सपोर्ट हब’ बनवणे अशक्य नाही,” असेही घोष यांनी स्पष्ट केले.