mh 13 news network
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्वसामान्य नागरिकांच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गंभीर नागरी समस्यांकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. शहरातील मूलभूत सुविधा सातत्यानं अपयशी ठरत आहेत आणि त्याचा थेट फटका नागरिकांना बसतोय. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली.
आज पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नागरी समस्यांचा मोठा अलार्म वाजतोय. वस्त्या-वस्त्यांत साचलेला कचरा, ढासळणाऱ्या आरोग्य सेवा, वाहतूक कोंडी, तुटलेले रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई.. हे सगळे अलार्म नागरिक रोज अनुभवत आहेत. जसं अलार्म आपल्याला वेळेत जागं करतो, तसंच हे प्रश्न प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना जागं करण्यासाठी आहेत.
कागदावर पुण्याला दरडोई सुमारे ३०० लिटर पाणी दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात अनेक नागरिक आजही टँकरवर अवलंबून आहेत. कचरा व्यवस्थापनातही हाच प्रकार आहे. हजारो सफाई कर्मचारी असल्याचं सांगितलं जातं, पण शहरभर कचऱ्याचे ढीग दिसताहेत. म्हणजे सांगितलं एक आणि केलं दुसरं, ही परिस्थिती स्पष्टपणे समोर आली आहे.
आज पुण्याचा AQI २८० पर्यंत पोहोचला आहे, जो अत्यंत धोकादायक आहे. नागरिक अक्षरशः प्रदूषित हवा श्वासात घेताहेत. पिंपरी-चिंचवडमध्येही परिस्थिती वेगळी नाही. नसबंदी अपयशामुळे हजारो कुत्रे चावण्याच्या घटना घडल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर, मानसिकतेवर आणि कौटुंबिक आयुष्यावर होत आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष “एक अलार्म, पाच काम” या स्पष्ट आणि ठोस संकल्पनेवर आधारित अलार्म कॅम्पेन सुरू करत आहे. खराब रस्ते आणि ट्रॅफिक जाम, कचऱ्याचा प्रश्न, पाणीटंचाई, अपुरी आरोग्यव्यवस्था आणि पर्यावरणाचा ऱ्हास हे पाचही अलार्म थांबवण्यासाठी ठोस कृती केली जाणार आहे.
लोकांनी आता घड्याळ चिन्ह दाबून स्पष्ट संदेश द्यायचा आहे की, ‘आता पुरे’. अलार्म दाबणं म्हणजे कामाची मागणी करणं, जबाबदारी ठरवणं आणि पालिकेची कामं पुन्हा वेगात, पारदर्शकपणे व प्रत्यक्षात दिसतील, अशा पद्धतीनं सुरू करणं.
नागरिकांना माहीत आहे की, थांबलेली कामं पुन्हा सुरू करण्याची आणि करून दाखवण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे. “एक अलार्म, पाच काम” या मोहिमेचा सविस्तर आराखडा आणि मुद्देसूद जाहीरनामा १० तारखेला जाहीर केला जाईल. या आराखड्यात ही प्राधान्याची कामं कशी पूर्ण केली जाणार आहेत, हे स्पष्टपणे मांडलं जाईल. ही लढाई राजकारणाची नाही, ही लढाई पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या दैनंदिन सुधारित जीवनमानासाठी आहे








