MH 13 NEWS NETWORK
माजी आ.यशवंत माने;ही निवडणूक विकास कामावर झाली नसून अपप्रचारावर आणि पैशावर झाली
सोलापूर प्रतिनिधी (नेताजी शिंदे)
मोहोळ मतदारसंघात काम करत असताना मी सर्व गावांना सर्वसमान विकासनिधी देण्याचे काम केले परंतु त्या कामाची पावती मतदार रुपी जनतेने दिली नाही पण
एकदा पराभव होतो, म्हणजे सर्व काही गमावलं असं नाही. पूर्वीप्रमाणेच मी तुमच्याबरोबर आहे. मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही.नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीचे निवडणूक लागणार आहेत. सर्व गावांमध्ये जाऊन आपल्याला काम करणे गरजेचे आहे. पराभव जरी झाला असला तरी येणाऱ्या काळात मी तुमच्याबरोबर आहे आठवड्यातील एक दिवस मतदार संघासाठी देणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार यशवंत माने यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीतील सर्व मित्र पक्षांच्या संवाद मेळावा रविवार दि.१ डिसेंबर रोजी घाटोळे मंगल कार्यालय अनगर येथे सकाळी घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील होते. प्रमुख उपस्थिती लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील,सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, ज्येष्ठ नेते कल्याणराव पाटील, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा वर्षाराणी शिंदे, ज्योत्सना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे म्हणाले मला पंधरा ते सतरा दिवसांमध्ये मालकांनी आमदार करून पाठवलं होतं. माझी जबाबदारी येणाऱ्या पाच वर्षामध्ये आहे.येणाऱ्या कालावधी मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर बाळराजे पाटील यांना विधान परिषदेची घेण्याची मागणी करणार आहे. चांगल्या प्रकारचे नेतृत्व या ठिकाणी युवकांमध्ये आहे. ही निवडणूक विकास कामावर झाली नसून अपप्रचारावर आणि पैशावर झाली असल्याचे यावेळी माने यांनी स्पष्ट येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व पदाधिकारी यांनी केवळ नावाला पद न घेता काम करून दाखवा असेही यावेळी त्यांनी बोलून दाखवले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह महायुतीतील सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
जनतेने दिलेला निर्णय मला मान्य
मागील तीन पिढ्यापासून विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमचे नेतृत्व स्वीकारले आहे. यावेळी जनतेनेच आम्हाला नाकारले आहे. त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याचा दोष नाही. कोणीही विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका. जनतेने दिलेला निर्णय मला मान्य आहे. माझ्या आई-वडिलांची शिकवण आहे. जय पराजय हसतमुखाने स्वीकारायचा असतो.
-राजन पाटील,माजी आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार परिषद.
सध्याची निवडणूक विकास कामावर झाली नाही.
माझा राजकीय जन्म हा सत्तेमध्ये झाला आहे. यावेळी जनतेनेच बदल करण्याचे ठरवले होते. सध्याची निवडणूक विकास कामावर झाली नाही. मागील दहा वर्षांमध्ये मतदारसंघांमध्ये विकास झाला नव्हता. माजी आमदार यशवंत माने यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मागील दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढला होता. साडेतीन हजार कोटी रुपयाचा निधी मतदार संघासाठी दिला आहे. जनतेने विकास काम पाहिले नाही.इथून पुढे पक्ष बांधणीसाठी जास्त लक्ष देणार
मोहोळ मतदारसंघांमध्ये कधीही जाती-धर्मावरच्या नावाखाली राजकारण झाले नसून नूतन आमदारांनी नुकतेच एक वक्तव्य केले की,अनगर हे माढा तालुक्याला जोडू माझे नूतन आमदारांना ओपन चॅलेंज असेल की,तुम्ही अनगर माढ्याला जोडण्याचे तर सोडा परंतु तुम्ही म्हटल्याप्रमाणे 30 दिवसात परत तहसील कार्यालय मोहोळला जोडून दाखवा.
--ज्योत्स्ना पाटील,महिला जिल्हा कार्याध्यक्षा सोलापूर.