mh 13 news network
आमदार सना मलिक शेख यांनी विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात एक महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये विवाहित महिलांना कागदपत्रांमध्ये आईचे नाव आणि नवऱ्याचे नाव दोन्ही लिहायला सांगितले होते.
14 मार्च 2024 रोजी शासन निर्णयाप्रमाणे आपल्या नावापुढे आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र महिलांची ओळख ही स्वतःच्या निवडीवर आधारित असावी असे मत अनुशक्ती नगरच्या आमदार सना मलिक शेख यांनी मांडले.
विवाहित किंवा अविवाहित महिलांना एक ऑप्शन देणे गरजेचे आहे ज्याच्या अनुषंगाने त्यांनी नाव कसे टाकायचे याचा निर्णय होणे गरजेचे असल्याचं त्यांनी सभागृहात सांगितलं.
यावर सभागृह अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रश्न महत्त्वाचा आणि लॉजिकल असल्याचे सांगून शासनाने याबाबत उचित निर्णय घेऊन लवकरात लवकर यासंदर्भात जीआर काढण्यास सांगितले.
जेव्हा महिला विवाहित होते तेव्हा आईचे आणि नवऱ्याचे नाव एकत्रित लावणे अवघड होते, त्यामुळे याबाबत महिलांना ऑप्शन देणे गरजेचे आहे. विवाहाआधीचे आडनाव आणि विवाहा नंतरचे आडनाव दोन्ही लावण्याची मुभा देण्यात यावी. असे नार्वेकर यांनी सभागृहात स्पष्ट केले.