mh 13 news network
केवळ निवडणुकीसाठीच स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर सोसायटी काढल्या
आमदार सुभाष देशमुख यांची विरोधकांवर टीका
सोलापूर : स्वतःच्या त कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर सोसायट्या काढल्या, त्यातून शेतकऱ्यांचे हित न पाहता बाजार समिती व डीसीसी बैंक निवडणुकीसाठी मतांचा वापर करून घेतला, अनेक वर्षे बाजार समितीची सत्ता आपल्याकडे होती तेव्हां काय केले?, असा सवाल आमदार सुभाष देशमुख यांनी केला.
सिद्धेश्वर बाजार समिती परिवर्तन पॅनलच्या प्रचारानिमित्त वडाळा येथे आयोजित बैठकीत आ. देशमुख बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे, महादेव चाकोते, जितेंद्र शिलवंत, उमेदवार संग्राम पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष रामकाका जाधव, वडाळ्याचे सरपंच जितेंद्र साठे, हरीदास शिंदे, भाजपा महिला आघाडीच्या वृषाली पवार, अण्णू मार्तडे, रविकांत पाटील आदींसह उत्तर तालुक्यातील विकास सोसायटी व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
आ. देशमुख पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी योजनांवर अभ्यास करायला हवा मात्र १० मिनिटात संचालक मंडळाची बैठक संपतात, मोठी उलाढाल असल्याने सोलापूर बाजार समिती देशात नंबर १ बाजार समिती आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. मात्र तसे कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.
महादेव चाकोते म्हणाले, मी चेअरमन असताना बाजार समितीच्या ठेवी ४० कोटींहून अधिक झाल्या होत्या. त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख चेअरमन झाल्यावर ठेवीत वाढ झाली मग मधल्या काळात ठेवी का वाढल्या नाहीत?
काका साठे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी काहीही न करता केवळ निवडणूक लढविण्यासाठी एकत्र यायचे हे काही नवे येथे ते नाही. अवघ्या १० मिनिटात बैठक संपविली जात असेल तर नियोजन कसे होणार? या बाजार समितीची बोलणी करताना आमदार सुभाष देशमुख यांना विचारात घेतले नाही. आता भाच्यासाठी मामा मदत करणार आहॆ.