MH 13 NEWS NETWORK
सोलापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मारेकऱ्यांना तात्काळ पकडावे या मागणीसाठी सोलापुरातील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्विकारावे अशी मागणीदेखील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी केली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे दास शेळके, दिलीप कोल्हे, अमोल शिंदे,प्रताप चव्हाण, अनंत जाधव, सुनील रसाळे, श्रीकांत घाडगे, शशी थोरात, शेखर फंड, योगेश पवार ,संजय शिंदे, महेश देवकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अंनत जाधव म्हणाले, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्विकारल्यास वाल्मिक कराडची दहशत कमी होईल. ही दहशत कमी झाल्यास बीड हे बिहार मध्ये नसून महाराष्ट्रात आहे हे लक्षात येईल असेही जाधव म्हणाले.
दरम्यान लवकरात लवकरच घटनेतील आरोपी तसेच मुख्य सूत्रधाराला पकडावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.