mh 13 news network
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात विहीर ढासळल्यामुळे दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भिमरत्न हरिश्चंद्र राजगुरू आणि नैतिक सोमा माने ही दोघे मुले पोहण्यासाठी विहिरीत उतरली असता ही दुर्घटना घडली. विहिरीचा काही भाग कोसळल्याने ते पाण्यात अडकले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

या दुःखद घटनेनंतर, दिनांक ८ मे रोजी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बोरामणी गावातील मृत मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना सांत्वन केले. त्यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले.