MH 13News Network
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात हजारो कंत्राटी कर्मचारी गेल्या काही वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर काम करत होते. त्यांच्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत सामावून घेण्याचा निर्णय झाला आहे. कर्मचारी आणि कुटुंबासाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे.
राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी १० वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर सामावून घेण्यात येणार असल्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याच्या निर्णयामुळे राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे अशी प्रतिक्रिया आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केली आहे.