MH 13News Network
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या मान्य न झाल्यास 29 ऑगस्ट पासून मुंबईत निर्णायक आंदोलन होईल असा इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की 28 ऑगस्टपर्यंत त्यांच्या आठ ते नऊ प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास ते 29 ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहेत.

अंतरवाली सराटीत चालू असलेले उपोषण ही यासोबतच कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गोरगरिबांच्या लेकरांसाठी मला आंदोलन घेणे भाग पडत आहे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आपल्याला ताकतीने उठाव करावा लागणार आहे. सगळ्या मराठा बांधवांनी 29 ऑगस्ट च्या अगोदर काम आवरून ठेवा, आता माघारी यायचं नाही. असेही त्यांनी स्पष्टपणे मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांना सांगितले.
मनोज जरांगे पाटलांनी याआधी केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये त्यांना यश मिळाले आहे. लाखो मराठा बांधवांना कुणबी मधून ओबीसी आरक्षण मिळाले आहे. सरकारी भरतीमध्ये तसेच शिक्षणामध्ये या आरक्षणाचा फायदा अनेक मराठा युवक युवतींना होत आहे.
सरकारकडे मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या..!
मराठा-कुणबी एक असल्याचा अध्यादेक्ष त्वरित काढावा..
58 लाख नोंदींच्या आधारे तत्काळ प्रमाणपत्रे द्यावीत…
आंदोलकांवरील सर्व संबंधित केसेस मागे घ्याव्यात..
.सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी…
संस्थानांच्या (हैदराबाद, औंध, सातारा, मुंबई) गॅझेट्स लागू करावेत..
सर्व जाती-धर्मातील मुलींना मोफत शिक्षण मिळावे…
‘आंदोलन शांततेतच होईल“!
सरकारने जर 28 ऑगस्ट पर्यंत जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर मराठा बांधवांसोबत मुंबईत आंदोलन करण्याचा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला तर… माझ्या मराठा बांधवांसोबत मी मुंबईत उतरणार आणि तेथे आमरण उपोषण करणार आहे. मात्र, आंदोलन शांततेतच होईल. कुणालाही धक्का लागू नये, ही माझी अपेक्षा आहे,” असे जरांगे यांनी शेवटी स्पष्ट केले.