Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने घेतली  जरांगे पाटलांची भेट ; नवं फॅक्टर होणार..?

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
155
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

प्रकाश आंबेडकर यांनी काल मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांची तातडीने भेट घेतली आहे.दोघांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीवर एक तास चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडी सोबत चर्चा जवळपास संपुष्टात आली आहे. जागा वाटपावरून एकमत होत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच्या भेटीला वेगळे महत्त्व आले आहे. यातून नवं फॅक्टर निर्माण होणार का.? याची चर्चा सुरू झाली आहे

मनोज जरांगे पाटील यांनी गावांमध्ये बैठका घेऊन, निवडणूक लढवावी का? मतदार संघातून एकच अपक्ष उमेदवार द्यावा का? याबद्दल समाजाकडून अहवाल मागविला आहे. तो अहवाल पाहून ३० तारखेला जरांगे पाटील पुढील निर्णय घेणार आहेत.

वेळोवेळी आपल्या भाषणांमधून प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मकता आणि आदर दर्शवला होता. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या प्रसंगी मराठा आरक्षणासंदर्भात, जरांगे पाटील घेत असलेल्या भूमिकेबद्दल आपली मते व्यक्त केली होती. दोघे आपापल्या समाजातील प्रमुख घटक असून त्यांच्या भूमिकेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजू शकते.

आज बुधवारी प्रकाश आंबेडकर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. वंचित समाजातील मते ही लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. यामुळे आंबेडकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने वेगळी भूमिका घेतली असून एकास एक उमेदवार देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी राखीव मतदार संघ असेल त्या ठिकाणी चळवळीतील आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही जातीच्या व्यक्तीला उभे करण्याची भूमिका घेतली आहे.

  राखीव मतदारसंघातील समाजाने उभे केलेल्या कार्यकर्त्याला मतदानाच्या माध्यमातून पाठबळ देण्याचे काम मराठा समाज करणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

दरम्यान, मराठा आणि वंचित समाज जर एकत्र आले तर महाराष्ट्रात नवीन राजकीय अध्याय सुरू होईल.अशी मोठी चर्चा मराठा समाज आणि वंचित घटकांमध्ये सुरू झाली आहे.

Tags: praksah ambedkarvanchit
Previous Post

माढा,सोलापुरात मराठा समाज देणार तगडा उमेदवार.! ; माळशिरस मध्ये गुरुवारी महाबैठक

Next Post

सोलापुरात तुकाराम बीज उत्साहात साजरी

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

सोलापुरात तुकाराम बीज उत्साहात साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.